रश्मी शुक्ला राज्य सरकारला मूर्ख बनवत आहेत: जितेंद्र आव्हाड
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पोलीस बदल्या करणारे रॅकेट असल्याचा आरोप करत आपल्याकडे पुरावे असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. हे सर्व पुरावे केंद्रीय गृहसचिव यांना देण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी केली होती. आता फोन टॅपिंग बाबात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आवाज उठविला आहे. गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केल आहेत. फोन टॅप प्रकरण अत्यंत भयंकर आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून महाविकास आघाडीची बदनामी करण्याचं हे एक नियोजनबद्ध केलेलं कारस्थान असल्याचे त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
“पोलिस अधिकारी आहोत म्हणून कोणीही नागरिकांचा फोन टॅप कसा करू शकेल? त्याकरिता त्यांचे कोणतेही नियम व कायदे नाहीत? या प्रकरणात असे दिसते की अधिकार्यांना वाटलं की ते काहीही करु शकतात आणि याची कोण खात्री देईल की अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते??
#rashmishukla यांच्या अहवालाने त्याच फक्त एक सरळ आणि स्वच्छ अधिकारी आहेत आणि बाकीचे सर्वच भ्रष्ट आहेत हा सरळसरळ केलेला पोलीस खात्याचा अपमान आहे शुक्ला यांनी नाव घेतलेल्या न सर्व अधिकाऱ्यांनी सरकारचा सल्ला घेऊन त्यांच्याविरोधात कोर्टात जावे.
पोलिस अधिकारी आहोत म्हणून कोणीही नागरिकांचा फोन टॅप कसा करू शकेल? त्याकरिता त्यांचे कोणतेही नियम व कायदे नाहीत? या प्रकरणात असे दिसते की अधिकार्यांना वाटलं की ते काहीही करु शकतात आणि याची कोण खात्री देईल की अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते??
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 24, 2021
राज्य सरकारकडून फोन टॅपिंगसाठी परवानगी देण्याची कारणे आहेत. फोन टॅपिंग नेमकं कोणत्या कारणासाठी आणि व्यक्तीसाठी केली जाते आणि नेमके काय घडले हे समस्त महाराष्ट्रासमोर जाहिररित्या आलं पाहिजे
राज्य सरकारला मूर्ख बनवत रश्मी शुक्ला यांनी ‘अ’ व्यक्तीच्या फोन टॅपिंगची परवानगी घेऊन ‘B’ व्यक्तीचा फोन टॅप केला हे अत्यंत भयंकर आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून महाविकासआघाडीची बदनामी करण्याचं हे एक नियोजनबद्ध केलेलं कारस्थान होतं”