‘या’ महिन्यापर्यंत देशात लसीचा तुटवडा असेल

१८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण खुले केल्याने लसींचा तुटवडा
मुंबई : जानेवारी फेब्रुवारीत कमी झालेल्या कोरोना विषाणूने देशात पुन्हा रौद्र रूप धारण केले आहे. कोरोना विरोधातील लढाईत लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. कोरोना रोखण्यासाठी देशातील तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. अनेक राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये लसीचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे.
१ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण खुले करण्यात आले आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची गती कमी केली आहे. याच दरम्यान ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाची लस कोविडशिल्डची निर्मिती करणाऱ्या सीरम इंन्स्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. जुलैपर्यंत देशात लसीचा तुटवडा असेल असं त्यांनी म्हटलं आहे.
एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील लसीकरणाची गरज भागवण्यासाठी ६० ते ७० मिलियन डोसेस पासून ते १०० मिलियन डोसेची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी जुलैपर्यंतचा वेळ जाऊ शकतो. सरकारने १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण खुले केल्याने लसींचा तुटवडा भासत आहे. असे पुनावाला यांनी म्हटले आहे.