पाच राज्याच्या निवडणुकीच्या तारखांची होणार घोषणा?
केंद्रीय मुख्यनिवडणूक आयुक्त यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वाचे लक्ष
दिल्ली: तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. या पाचही राज्याच्या विधानसभेची मुदत मे आणि जून महिन्यात संपुष्टात येत आहे. आज ४ वाजता केंद्रीय मुख्यनिवडणूक आयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्षांनी आता पासून जोरदार तयारी सुरु केली आहे. या निवडणूकांकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पश्चीम बंगाल मध्ये तळ ठोकून आहेत. पश्चीम बंगाल मध्ये भाजपने पूर्ण ताकत लावल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून पश्चीम बंगाल मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजप जोर लावत आहेत.
तर, तामिळनाडू राज्य सरकारचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे. पश्चीम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ३० मे रोजी संपणार आहे. आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ रोजी संपणार आहे. केरळचा कार्यकाळ १ जुन रोजी संपणार आहे. तर पद्दुचेरी राज्याचा कार्यकाळ ८ जून रोजी संपुष्टात येणार आहे. यामुळे या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यात वर्तविण्यात येत आहे.
मात्र, गेल्या काही दिवसात देशाभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग कशा प्रकारची नियामवली तयार करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.